Jay bajrang yuvak krida va sanskrutik mandal adsul
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि मानसिक ताण यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबांवर व ग्रामीण समाजावर मोठा परिणाम झाला. या समस्येचा अभ्यास करून एका युवक मंडळाने शेतकऱ्यांची सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि आर्थिक अडचणी समजून घेतल्या.
या अडचणी दूर करण्यासाठी शेतीतील खर्च कमी करणे, उत्पन्न वाढवणे, सेंद्रिय शेतीचा वापर करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि शेतीसोबत पूरक व्यवसाय सुरू करणे यावर भर देण्यात आला. तसेच अनावश्यक खर्च कमी करणे, सामूहिक विवाह प्रोत्साहित करणे आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे उपाय सुचविण्यात आले.
यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारून आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
